११.२२.२००९

2012-The End of The World

2012 - The End of the Worldकालच 2012-The End of The World सिनेमा पाहिला. मित्राने तिकिटे काढून ठेवली होती, म्हंटले चला तसे फुकट कोणीतरी नेतंय म्हंटल्यावर नाही कशाला म्हणायचे. तसे आजकालच्या जमान्यात कोण कोणाला फुकट नेईल ते पण सिनेमा पाहायला, छे आजकाल जेवायलासुद्धा कोणी फुकट नाही देत.
ते जाऊदेत, हा तर आपण 2012 विषयी बोलत होतो. सिनेमा चांगला होता. त्यात मानवाच्या विचारशक्तीचे आणि 3D Animation च्या किमयेचे कौतुक करावेसे वाटते. काय किमया आहे तंत्रज्ञानाची, आपण पृथ्वीचा आणि पर्यायाने जगाचा अस्त अनुभवतोय . . . आपल्याला माहित आहे कि हे सर्व प्रत्यक्षात घडू शकते पण त्याला खूप अवकाश आहे असे समजून आपण निर्धास्त जीवन जगतोय . . . तो सिनेमा पाहिल्यावर मला स्वतःचीच कीव आली . . आपण छोट्या छोट्या गोष्टीतून जगाचा विनाश जास्त जवळ आणतो आहोत . . . आपण साध्या काही नियम पाळले तर हे आपण रोखू सुद्धा शकतो . . . आपण झाडे लावू शकत नाही तर ती तोडण्याचा आपल्याला काय अधिकार ? आपणच घाणेरडे वायू कारखान्यातून बाहेर सोडतो . . . आपणच नद्या तलाव खराब करतो . . . याशिवाय अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण जाणून बुजून करतो . . . का करतो हे सर्व आपण, शाळेत शिकतो कचरा डब्यातच टाका . . . पण कधीकधी त्याचा पण आपण कंटाळा करतो . . . कधीकधी तर हातातला कागद रस्त्यावर सुद्धा टाकून देतो . . . का तर त्यासाठी काही कष्ट घ्यावे लागणार नसतात ना . . . एवढे स्वार्थी झालो का आपण ? जर जगबुडी झालीच तर तोपर्यंत आपण नसू सुद्धा या कल्पनेतून आपण निर्धास्त आहोत, आणि मनाला येईल तसे वागत आहोत . . . अहो पण आत्ता सुद्धा महापूर, सुनामी, भूकंप, अवकाळी पाउस यातून आपण जगबुडीची सुरुवात पाहत आहेच की . . . आता तरी जागे व्हा, हे सर्व थांबवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करा . . . हे लगेच शक्य नाही . . . यासाठी खूप काळ लागेल पण आपण मानवजातीचा विनाश पुढे नक्कीच ढकलू शकतो . . . विचार करा !

2 comments:

Pankaj Giram म्हणाले...

mmmm.. good thinking..
i think that is really very true but we have to do something for this world, 2012 is the really great moive when i saw this moive i realised that we have to do something really very fast, but as per u say its very late but, dont mind we can do it....
i am with u... to save to world...
be happy.. :)

Unknown म्हणाले...

उठा खडबडून जागे व्हा . . .

आपण छोट्या छोट्या गोष्टीतून जगाचा विनाश जास्त जवळ आणतो आहोत . .हे आपण रोखू सुद्धा शकतो .. but how???????
do u know who is main problem creator of this entire ecological system? answer is human.......
unless and until we dont have the wisdom to know what is right and what is wrong,such things will countinue,hence human should know thyself.....but how? unless and until if he is not connect that supreme power he cannot know himself and meaning of his life.......
so to know the meaning of his life he should introspect and connect himself to the all pervading divine power,who that is within us. in marathi u can say "DEH DEVACHE MANDIR"
but where is god and how to connect us with him. A way is called SAHAJAYOGA.TO KNOW MORE ABOUT SAHAJAYOGA , www.sahajayoga.org.in
or u can free talk to me on this topic as i have a lot of experience in this regard and i want to share with u as a friend. milindsonwane@yahoo.co.in

टिप्पणी पोस्ट करा