११.२५.२००९

उठा खडबडून जागे व्हा . . .

Mumbai Terror Attack - 26 Nov. 2008
गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर २००८ ला आपल्या भारत देशावरील भ्याड आणि क्रूर अतिरेक्यांच्या हल्ल्याला १ वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने त्या हल्ल्यात माझ्या शहीद पोलीस बांधवांना श्रद्धांजली म्हणून मी हा लेख लिहित आहे . . गेल्यावर्षी जो अतिरेकी हल्ला झाला तो केवळ मुंबईवरील हल्ला न्हवता, तर तो संपूर्ण भारतावर, प्रत्येक भारतीयावर आणि भारतावर प्रेम करणाऱ्यावर झालेला क्रूर हल्ला होता. पण हा हल्ला आपल्या सगळ्यांना बराच काही शिकवून गेला, आपल्या आजुबाजूंना घडणाऱ्या घटना आपल्या जीवनावर किती विपरीत परिणाम करू शकतात ते शिकवून गेला. त्या हल्ल्यात किती शूरवीर पोलिसांचे आणि जवानांचे प्राण गेले हे सर्व थांबवणे संपूर्णपणे आपल्या हातात नाही, परंतु आपण त्यासाठी प्रयत्न तर करू शकतो।
अशी घटना घडल्यावर पहिले बोट राज्यकर्त्यांवर दाखवण्यात काही जण शहाणपणा समजतात, पण ते राज्यकर्ते पण शेवटी माणूसच आहेत, आणि पोलीस सुद्धा . . ते प्रत्येक क्षणाला एवढ्या मोठ्या शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर कशी की नजर ठेवणार, प्रत्येक येणाऱ्या जाणार्याची चौकशी ते करू शकतील का । .
आपण या देशाचे नागरिक आहोत तर आपली पण काही जबाबदारी आहे कि नाही. जर आपणच आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांबाबत जागरूक राहिलो तर पोलिसांचे काम सोपे नाही का होणार . . आपल्याशेजारी कोण राहत आहे . . ते काय करतात. या गोष्ठीवर तर आपण गुप्तपणे का होईना नजर ठेवू शकतो ना? का प्रत्येकावर पोलीस आणि सरकारनेच नजर ठेवायची? मान्य आहे कि आपली सरकारी धोतर काही एकदम साफ नाहीत, पण मग काय त्यावर ताशेरे ओढण्यातच धन्यता मानायची का . . आणि सरकारनेही देशाची सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक बनवणे तितकेच गरजेचे आहे. देशाचे समुद्रकिनारे सुरक्षित करणे गरजेचे आहे . . सुरक्षेच्या कामात ढिसाळपणा देशाला किती महागात पडतो हे आपण या हल्ल्यात बघितले . . . आता देशाला शक्तिशाली, सुरक्षित बनवण्याची गरज आहे, शहराच्या प्रत्येक भागात तरुणांनी एकत्र येऊन आप्तकालीन सुरक्षा गट बनवण्याची गरज आहे. त्या गटाने आप्तकालीन परिस्थितीत पोलिसांच्या मदतीने सुरक्षा आणि मदत कार्य करावे . . सर्व पोलीस ठाणी अत्याधुनिक करणे गरजेचे आहे.
प्रत्येक भारतीयाने आपल्या परीने देशाचे रक्षण करण्यात आपली छोटीशी का होईना भूमिका बजावणे गरजेचे आहे . . मग कुणाची हिम्मत होईल भारतावर असे भ्याड हल्ले करायची . . . चला तर आपण यापुढे तरी आपल्या परीने देशाचे, आणि आपल्या देशबांधवांचे रक्षण करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याची शपथ घेवूया . . . तीच आपल्या शहीद जवानांना आणि पोलिसांना खरी श्रद्धांजली ठरेल . .

जय हिंद - जय भारत
( आपल्या देशाला सुरक्षित राष्ट्र बनवण्यासाठी काय करायला पाहिजे ते इथे आपल्या प्रतिक्रियांच्या रुपात जरूर कळवा. )

1 comments:

Suryakant Dolase सूर्यकांत डोळसे म्हणाले...

***** आजची वात्रटिका *****
*********************

ज्वाला बने ज्योती

२६/११ नंतर पेटलेली
ती आग,आग राहिली नाही.
तेंव्हा जी आली होती
ती जाग,जाग राहिली नाही.

हा महिमा काळाचा की,
आम्हीच विसराळू आहोत?
आम्हांस ना देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत?

त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे,
सार्‍या गोष्टी ध्यानी आल्या आहेत.

झटका भोवतालची राख
आतले निखारे धगधगु द्या !
दुश्मनांची हिंमत होईल कशी?
त्यांना हे निखारे बघू द्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
---
आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या.
http://suryakantdolase.blogspot.com/

टिप्पणी पोस्ट करा