१.३०.२०१०

मराठी ब्लॉगर्स : आता एका कुटुंबाच्या दिशेने . . .

Marathi Blogs
बरेच दिवस काही महत्वाच्या कामांमुळे ब्लॉगकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. पण तरीपण मराठी ब्लॉगविश्वात राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला, या काळात वेळ मिळेल तेंव्हा इतरांचे ब्लॉग वाचले, त्यावर Comments पण दिल्या . . काही मित्रांना स्वतःचा ब्लॉग सुरु करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यासाठी मदत केली . . मग लक्षात आले कि या ब्लॉगविश्वाशी एक प्रकारचे वेगळे नाते निर्माण झाले आहे . .
http://www.marathiblogs.net/ या मराठी ब्लॉगर्सच्या संकेतस्थळावर ब्लॉगर्सचे एकत्र कुटुंब निर्माण झाले आहे. इथे प्रत्येक जण सुरवातीला नवखा असतो पण नंतर त्याने लिहलेल्या लेखावर आलेल्या Comments मधून तो शिकत जातो आणि मग एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे तो इथे रुळतो . . आणि या ब्लॉगर्सच्या कुटुंबाचा एक भाग बनतो . . आणि मग स्वतःसुद्धा चांगले लेख लिहू लागतो . . आणि या कुटुंबातील सदस्यसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ती वाढतच राहील . . यातून आता नवीन चळवळ उभी राहत आहे. आत्ताच मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला मेळावा पार पडला . . दुर्दैवाने त्यावेळी उपस्थित राहता आले नाही . . पण आत्तापर्यंत केवळ ब्लॉगवरील Comments च्या माध्यमातून झालेली ओळख , त्यातूनच विश्वास ठेवून दिलेले आमंत्रण यातून हा पहिलावहिला ब्लॉगर्स मेळावा पार पडला. या सगळ्याचे श्रेय मराठी ब्लॉग विश्वातल्या काही शिलेदारांना जाते . . यात प्रामुख्याने पंकज, भुंगा, महेंद्रजी, सुहास पेठे, अनिकेत समुद्र इत्यादींचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. आत्ता १-२ दिवसांपूर्वी पंकजच्या ब्लॉगवर मला कळले कि मराठी ब्लॉगर्सनी आता Google Group वर सुद्धा एक स्वतंत्र विभाग उघडला आहे . . ते पाहून खूप आनंद झाला. आणि लगेच ती लिंक माझ्या अनेक ब्लॉगर्स मित्रांना पाठवली. अश्या तर्हेने हि चळवळ देश-विदेशातील मराठी ब्लॉगर्स पर्यंत पोहचेल असा विश्वास वाटतो . . यासाठी तुच्याकडे काही नवीन क्लुप्त्या असतील तर जरूर सांगा . . आपण सर्व मिळून त्या प्रत्यक्षात आणायचं प्रयत्न करू . . .

चला आता काहीतरी नवीन पोस्ट टाकायला हवी . . तर आपण भेटत राहूच . .

१.१२.२०१०

पैसा आणि आपण . . .

Paisa, Maney'पैश्यासाठी माणुस जगतो, पैश्यासाठी मरतो' या आशयाच्या काही ओळी माझ्या कानावर पडल्या, मग असाच विचार आला कि खरंच राव आपण सगळे फक्त पैश्यासाठी न्हवे तर पैश्यासाठीच जगतो खरंय की नाही आपण जे काही या जगात करतो ते पैश्यासाठी . . . परवा एक दिवस पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले तेव्हा मनात विचार आला की या जगातील प्रत्येक जण त्या काही ठराविक चित्र छापलेल्या कागदाच्या तुकड्यांवर किती अवलंबून आहे . . त्या तुकड्यांना जे देवाने नाहीटर माणसानेच देवाण-घेवाणाचे साधन बनवले . . त्यांना मिळवण्यासाठी प्रत्येकजण आयुष्यभर झगडतो, पडेल ते काम करतो . . आणि काम मिळवण्यासाठी शिकतो . . . कधीकधी तर फक्त चार नोटा जास्त मिळवण्यासाठी मनाविरुद्ध कामाचे क्षेत्र निवडतो. आणि मग स्वताच्याच मनात कुजत राहतो . . . पण इथे त्याची काहीच चूक नसते कारण हे जग फक्त पैश्यावर चालते . . . 'ज्याच्याकडे पैसा - तो राजा' हा या जगाचा अलिखित नियमच बनलाय. मग काय आपले आयुष्य जर आरामात जगायचे असेल, वाढत्या महागाईला तोंड द्यायचे असेल तर पैसा तर कमवावाच लागणार . . मग काय ओवरटाईम काम किंवा मग जोडधंदा ठरलेलाच . . . काही लोक पैसा कमावण्यासाठी वाईट कामाला लागतात, पैश्यासाठी चोऱ्या करणे, दरोडा टाकणे एवढेच नाही तर कुणाच्या जीवावर देखील उठतात . . भ्रष्टाचार, चोऱ्या, खून हे माणसाच्या अतृप्तपणाची लक्षणे आहेत.
काहींचे असे म्हणणे असते की आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा-भावना दूर तर ठेवाव्याच लागणार . . पण पैश्यामुळे मानसन्मान तर मिळेल पण मनशांती नाही . . आत्ता 3 idiots पहिला . . त्यात हेच सांगितले आहे . . की कधीपण स्वतःच्या मनाचे पहिले ऐका . . जिथे तुम्हाला आनंद मिळेल असेच काम करा . . मग तुम्ही त्यात यशस्वी नक्कीच व्हाल . . आणि मग काय यश मिळाले की नाव होईल आणि पैसाहि येईल . . आपण पैश्यामागे धावण्यापेक्षा त्याला आपल्यामागे धावायला लावा . . पैश्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्यातला आनंद वाया जाऊन देऊ नका. मी काही कोणाला उपदेश करत नाही . . परंतु माझे एकाच सांगणे आहे की देवाने आपल्याला जन्म दिला तो काय पैसा कमवायला . . माझे म्हणणे आहे की फक्त पैश्यामागे धावून काही उपयोग नाही कारण त्याला सीमा नाही । . आणि आयुष्यभर फक्त पैश्यामागे धावत राहिलो तरी आयुष्य पुरणार नाही आपल्याला . . .

तेंव्हा पैसा भरपूर कमवा पण आपले आवडते काम करून . .