१२.०८.२००९

सारे जणू काही फक्त माझ्यासाठीच . . .

परवा एक दिवस रविवारी ऑफिसला काम होते म्हणून गेलो होतो, खरतर रविवारी ऑफिस नसते पण काही काम होते म्हणून गेलो होतो . . . तसे काम होते एक तासाभराचे पण त्यासाठी दुपारपासूनच बोलावले होते . . शेवटी काम काहीच झाले नाही पण त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्येच होतो . . रात्रीचे १० वाजल्यापासून ऑफिसमधून एकेक जण घरी जायला निघाला . . तसे त्यांचे काम झाले होते . . . पण आम्हा काही जणांनी दिवसभर काहीच काम केले न्हवते . . किंवा आम्हाला करायला दिलेच न्हवते मग काय दिवसभर नुसता टाइमपास आणि नेटगिरी . . .
बर ते जाऊ देत . . . त्या दिवशी रात्री २ वाजल्यावर मी आणि माझ्या २ मित्रांनी ठरवले कि आता रात्री घरी नको जायला, ऑफिस मध्येच थांबूया कारण आमचे घर ऑफिसपासून २०-२५ किलोमीटर दूर आहे आणि घरातील सगळे झोपले असतील असे समजून आम्ही ठरवले . . मग काय आम्ही ठरवतो काय आणि मला घरून फोन आला, मग म्हंटले कि घरीच जाऊन झोपू कारण दुसर्यादिवशी परत ऑफिसला यावे लागणार होते . . मग आम्ही घरी निघालो . . आम्ही हायवेवरून निघालो . . . थंडी खूप वाजत होती, नशीब त्या दिवशी स्वेटर बरोबर होता . . मधूनच एखादी गाडी जात होती . . . एवढा सुनसान हायवे प्रथमच पाहत होतो, पण खूप बरे वाटत होते . . नंतर पुढे माझे दोघे मित्र मध्येच त्यांचे घर आल्यावर गेले . . . मग काय एकटा जीव सदाशिव, चाललोय एकटाच . . . पुढे मी आमच्या सिंहगडरोड ला आलो . . . मग काय तिथे तर इतकी शांतता कि ते म्हणतात ना ' टाचणी पडली तरी आवाज यायला हवा' तशी अवस्था . . . ती शांतता पाहून असे वाटायला लागले कि मी एकटाच आहे काय या जगात . . . आणि इथले सारे काही फक्त माझ्यासाठीच आहे काय . . . . जिथे दररोज दिवसा लाखो माणसांची आपापली गडबड सुरु असते, कि त्या वातावरणाचा आपल्याला तिटकारा येतो . . . मनाला शांती हवीहवीशी वाटते मग आठवड्याच्या एका सुट्टीत कुठेतरी शांततेसाठी ठिकाणाचा शोध सुरु होतो . . . पण मी त्या रात्री जे काही अनुभवत होतो ते इतका प्रसन्न होते, कि मी एक वेळ भान विसरून गेलो . . खरच मी एक सुंदर स्वप्न पाहत असल्यासारखंच सगळा काही होते . . . तेवढ्यात मी घरापाशी आल्याच मला जाणवलं . . . आणि मी त्या सुंदर दुनियेला नजरेत साठवून आमच्या इमारतीत प्रवेश केला आणि मग ती सुंदर दुनिया नजरेत साठवत झोपी गेलो . . .

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा